*सकारात्मक दृष्टी (बालसंस्कार)*
एकदा एक वाटसरु जंगलातून जात होता , चालून - चालून थकला होता . भूकही लागली होती . विश्रांतीसाठी तो एका विस्तीर्ण झाडाखाली जाऊन बसला .
बसल्या बसल्या त्याच्या मनात विचार आला , आता जर थंडगार पाणी मिळाले असते तर किती बरे झाले असते ! हा विचार येण्याचा अवकाश , लगेच थंडगार पाण्याने भरलेला चांदीचा पेला त्याच्यासमोर हजर होतो . खुप आनंदाने तो पाणी पितो .
नंतर विचार करतो , ' अरे पाणी मिळाले , तसे भोजन मिळाले तर ' हा विचार येताच क्षणी सोन्याच्या ताटात पंचपक्वान्न हजर ! भूक लागलेलीच होती . त्याने पटपट जेऊन घेतले .
परत विचार आला , ' तहान , भूक तर भागली आता आराम करायला बिछाना अन् उशी मिळाली तर काय मौज येईल !' ताबडतोब गादी , उशी हजर ! वाटसरू आनंदाने आराम करु लागला .
आता त्याच्या रिकाम्या मनात विचार येऊ लागले , ' पाणी मागितले पाणी हजर , अन्न हजर , बिछाना - उशीसुध्दा तयार . मनात आल्याबरोबर हे सगळे हजर . मग इथे एखादा राक्षस तर नाही ना ?' आणि ... राक्षस हजर !
त्याला पाहताच वाटसरुच्या मनात घाबरुन विचार आला . ' बापरे ! हा राक्षस मला खाणार तर नाही ना ?' हा विचार येताच राक्षसाने त्याला गट्टम केले देखील !
ही गोष्ट बालसंस्कार केंद्रात सांगून मुलांना सांगितले की , ' या गोष्टीचा सकारात्मक शेवट करा ' मुलांनी लगेच सांगितले , *' जीवनविद्या सांगते , देतो तो देव .'*
त्या वाटसरुने जे - जे मागितले , ते - ते त्याला मिळाले , मग त्याच्या मनात असा विचार यायला हवा होता . *' इथे एखादा देवदूत तर नसेल ना ?'* आणि जर देवदूत हजर झाला असता , तर त्याच्याकडे , *' सर्वाचे भले कर , कल्याण कर , सर्वांना सुखात , आनंदात ठेव , असे मागितले असते !'* ही सकारात्मक दृष्टी जीवनविद्या देते .
मित्रांनो , तो वाटसरु बसला होता *' कल्पवृक्षाखाली '.* कल्पवृक्ष म्हणजे पुराणात उल्लेखलेला एक काल्पनिक वृक्ष , जो त्याच्याखाली बसलेल्याच्या मनात जे - जे संकल्प येतात , ते त्वरीत पूर्ण करतो . पण प्रत्यक्षात मात्र हा कल्पवृक्ष ' मन ' रुपाने आपल्या प्रत्येकामध्ये हजर आहे .
जीवनशिल्प घडवण्यासाठी मनाचे हे दिव्य उपकरण अत्यंत महत्वाचे आहे . कसे ? ते जाणून घेऊयात पुढील भागात !
------------ *आदरणीय श्री प्रल्हाददादा पै .*
*(जीवनविद्या मिशन)*
😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇
एकदा एक वाटसरु जंगलातून जात होता , चालून - चालून थकला होता . भूकही लागली होती . विश्रांतीसाठी तो एका विस्तीर्ण झाडाखाली जाऊन बसला .
बसल्या बसल्या त्याच्या मनात विचार आला , आता जर थंडगार पाणी मिळाले असते तर किती बरे झाले असते ! हा विचार येण्याचा अवकाश , लगेच थंडगार पाण्याने भरलेला चांदीचा पेला त्याच्यासमोर हजर होतो . खुप आनंदाने तो पाणी पितो .
नंतर विचार करतो , ' अरे पाणी मिळाले , तसे भोजन मिळाले तर ' हा विचार येताच क्षणी सोन्याच्या ताटात पंचपक्वान्न हजर ! भूक लागलेलीच होती . त्याने पटपट जेऊन घेतले .
परत विचार आला , ' तहान , भूक तर भागली आता आराम करायला बिछाना अन् उशी मिळाली तर काय मौज येईल !' ताबडतोब गादी , उशी हजर ! वाटसरू आनंदाने आराम करु लागला .
आता त्याच्या रिकाम्या मनात विचार येऊ लागले , ' पाणी मागितले पाणी हजर , अन्न हजर , बिछाना - उशीसुध्दा तयार . मनात आल्याबरोबर हे सगळे हजर . मग इथे एखादा राक्षस तर नाही ना ?' आणि ... राक्षस हजर !
त्याला पाहताच वाटसरुच्या मनात घाबरुन विचार आला . ' बापरे ! हा राक्षस मला खाणार तर नाही ना ?' हा विचार येताच राक्षसाने त्याला गट्टम केले देखील !
ही गोष्ट बालसंस्कार केंद्रात सांगून मुलांना सांगितले की , ' या गोष्टीचा सकारात्मक शेवट करा ' मुलांनी लगेच सांगितले , *' जीवनविद्या सांगते , देतो तो देव .'*
त्या वाटसरुने जे - जे मागितले , ते - ते त्याला मिळाले , मग त्याच्या मनात असा विचार यायला हवा होता . *' इथे एखादा देवदूत तर नसेल ना ?'* आणि जर देवदूत हजर झाला असता , तर त्याच्याकडे , *' सर्वाचे भले कर , कल्याण कर , सर्वांना सुखात , आनंदात ठेव , असे मागितले असते !'* ही सकारात्मक दृष्टी जीवनविद्या देते .
मित्रांनो , तो वाटसरु बसला होता *' कल्पवृक्षाखाली '.* कल्पवृक्ष म्हणजे पुराणात उल्लेखलेला एक काल्पनिक वृक्ष , जो त्याच्याखाली बसलेल्याच्या मनात जे - जे संकल्प येतात , ते त्वरीत पूर्ण करतो . पण प्रत्यक्षात मात्र हा कल्पवृक्ष ' मन ' रुपाने आपल्या प्रत्येकामध्ये हजर आहे .
जीवनशिल्प घडवण्यासाठी मनाचे हे दिव्य उपकरण अत्यंत महत्वाचे आहे . कसे ? ते जाणून घेऊयात पुढील भागात !
------------ *आदरणीय श्री प्रल्हाददादा पै .*
*(जीवनविद्या मिशन)*
😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇
No comments:
Post a Comment